Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हे मंदिर करणार संपूर्ण जगाचा अंत.. आत्तापर्यंत 3 युगांचा अंत झाला आहे.. जाणून घ्या यामागील रहस्य

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, भारतामध्ये अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आणि मंदिरे आहेत ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण पाहणार आहोत भारतातील एका अशा मंदिराविषयी जे मंदिर फार पूर्वीपासून आहे. या मंदिराची आपल्या चार युगाचा सं’बंध आहे असे म्हटले जाते. असे का म्हटले जाते ते आज आपण पाहूयात. हे मंदिर आहे “केदारेश्वर गुफा मंदिर”.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड येथे आहे. हरिश्चंद्रगड हा एक किल्ला असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेकिंग गड यापैकी हा एक आहे. हा किल्ला अतिशय प्राचीन असून या किल्ल्याचे निर्माण सहाव्या शतकात कलचोडी राजवंश यांच्या काळात झाला होता. शहरवासीयांसाठी हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला अकराव्या शतकातील गुफा आणि मंदिरांची आठवण करून देतो.

या किल्ल्यात भगवान शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत. तेथे असलेल्या हरिश्चंद्र मंदिरा जवळ मुख्य तीन गुफा आहेत. हरिश्चंद्र मंदिराच्या उजव्या बाजूस गेले असता केदारेश्वर ची मोठी गुफा आहे. या गुफेमध्ये भगवान शंकराचे मोठे शिवलिं’ग स्थापित आहे. या शिवलिं’गाच्या चारही बाजूला पाणी आहे. पाण्याची खोली साधारणतः तीन फूट असल्याकारणाने शिवाय हे पाणी फार थंड असल्याने,

या शिवलिं’गापर्यंत पोहोचणे कठीण जाते. केदारेश्वर गुफेकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा धबधबा देखील आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी जाणे कठीण होते. या शिवलिं’गाच्या चारही बाजूला चार रहस्यमय स्तंभ आहेत. हे शिवलिं’ग जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या असे लक्षात येईल की, याचे तीन खांब मो’डले आहेत आणि एक खांब चांगल्या स्थितीत आहे.

त्या एका खांबाच्या आधारावर हे सर्व टिकून आहे. या स्तंभांविषयी वास्तवात कोणालाही माहिती नाही. परंतु असे म्हटले जाते की, या स्तंभांचा निर्माण जीवनातील चार युग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यांना दर्शवण्यासाठी केला गेला आहे. जेव्हा एक युग समाप्त होण्याच्या मार्गावर येतो तेव्हा असे मानले जाते की, यातला एक खांब तु’टतो. या मंदिराचे तीन खांब आधीच तु’टले असून,

सध्या वर्तमानात कलियुग चालू असल्यामुळे असे मानले जाते की, राहिलेल्या चौथा स्तंभ हा कलियुगाचा आहे. जेव्हा हा चौथा स्तंभ तु’टेल तेव्हा हा कलियुगाचा अंत मानला जाईल. याचा साधा अर्थ असा आहे की, जेव्हा हा स्तंभ तुटेल तेव्हा या जगात प्रलय येईल आणि कलियुगाचा अंत होईल. या चारही स्तंभांमध्ये सत्ययुगाचा जो स्तंभ आहे तो,

तु’टलेला असून, पूर्णतः नष्ट झालेला आहे. दुसरा स्तंभ जो त्रेतायुगाचा आहे तो अर्धा तु’टलेला आहे. द्वापार युग संपून जास्त दिवस झाले नसल्यामुळे हा स्तंभ अर्ध्यापेक्षा जास्त दिसत आहे. आता वेळ आली आहे चौथा स्तंभ म्हणजे कलियुगाचा स्तंभ तु’टण्याची. जर तुम्ही महाराष्ट्र पर्यटन सर’कारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाल तर तेथे केदारेश्वर मंदिराविषयी विस्तारित माहिती दिली आहे.

त्यावर असे लिहिले आहे की, हे चार स्तंभ चार युगांचे प्रतिनिधित्व करतात जेव्हा शेवटचा स्तंभ तु’टेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल. जीवनामध्ये जर शक्य झाले तर एक दिवस नक्की या ठिकाणी भेट द्या आणि केदारेश्वरचे दर्शन घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.