Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मुलगा म्हाताऱ्या आईला महालक्ष्मी मंदिराबाहेर सोडून पळून गेला.. त्यानंतर त्या आईची अवस्था पहा.. आपल्या मुलांना हा लेख नक्की वाचायला द्या..

नमस्कार मित्रांनो..

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती, यासाठी महिन्याला तीस रुपये द्यावे लागायचे, या सायकली वर लक्ष ठेवण्यासाठी तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती, चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून बसायची, त्यातच गोणपाट अंथरून बसलेली अंगावर एकदम जुनी साडी ते पण मळलेली, तिच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकले होते.

साधारण ७० ते ७५ वय असावे तिचे. थंडीपासून बचावासाठी आजी सकाळी चादर वापरत होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली असायची, समोर एक जर्मनच ताट आणि स्टीलची वाटी एवढंच साहित्य होतं तिच्याजवळ आणि चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायच एक दिवस संध्याकाळी घरी जाताना शाम सायकल काढत होता,

तेव्हा तिने विचारलं बाळ नाव काय तुझं ? श्याम.. त्याने सांगितलं. कदाचित ते त्यांना समजलं नाही, मग श्याम पुन्हा बोलला नंतर त्या बोलल्या अच्छा असं नाव आहे व्हय! त्यांनी इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असतं गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकलेल्या श्यामच्या डब्याकडे पाहून त्या आजीने विचारलं यामध्ये काही शिल्लक आहे का श्याम ?

या प्रश्नाने तो गोंधळाला नाही म्हणून सांगताना का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं पण काही बोलला नाही, तोच हसरा चेहरा करून आजी म्हणाली काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा मला देत जा हे सांगताना त्या आधीचा चेहरा जरी हसरा असला. तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण त्यांची मजबुरी होती.

शाम हो बोलला घरी आल्यानंतर रात्री आई जवळ बसला आणि त्या आजी बद्दल सांगितलं आईलाही खूप वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी आईने न सांगता डब्यात दोन चपात्या जास्त भरल्या आणि म्हणाली, त्या आजीला दे श्यामला खूप बरं वाटलं श्याम निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला आता गेल्यावर दे म्हणजे आत्ताच लगेच खातील शाम हो बोलून निघाला त्या आजी झोपल्या होत्या.

त्यांना चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिली त्या आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळाले दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक आठवण झाली एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्याचे जेवण शिल्लक होतं ते शामने डब्यात भरून घेतलं संध्याकाळी तो डबा आजीला दिला.

मग त्या आजी गोड हसल्या, त्याने डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडे दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्यात तुकड्या जवळ ठेवलं श्याम त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होता पुन्हा जवळ येऊन बसला श्यामने विचारले आजी काय करत आहात तुम्ही ? तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि,

तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि पळून गेली कदाचित तो तुकडा आणखीन एखादा भुकेल्या पिल्लांसाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळा अनुभव आला श्यामने त्याचा डब्यातून काही भाग आजीला दिला होता आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास चिमण्यांना दिला होता,

आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग त्याच्या पिलांसाठी नेला कदाचित हे दुसऱ्यासाठी थोडसं सुख घेऊन जाणे असेल. जवळ जवळ एक वर्ष असंच चालू राहिलं नंतर श्याम शिक्षण पूर्ण करून पुण्याला जॉब साठी गेला. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आज्जीकडे पेढे घेऊन गेला आणि त्यातला अर्धा पेढा आजीने मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या आठवणीने मला पेढा दिला यातच समाधान आहे,

माझ्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणले आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू मला प्रेमाने पेढा दिला खूप समाधान वाटलं खूप मोठा साहेब होशील. आजीच्या पाया पडून श्याम तेथून निघाला, तेंव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवून खूप सोप्प आहे म्हणजे,

एखाद्याला आपण आनंद दिला की त्याच्या बदल्यात आपल्याला समाधान आणि आशीर्वाद मिळून जातात तरी आपण दुसरीकडे शोधत बसतो यामध्ये वर्ष निघून गेलं आता श्याम मोठा ऑफिसर झाला होता. आजीला भेटण्यासाठी श्याम गेला पण त्या तिथे नव्हत्या त्यांचे साहित्य नव्हतं फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती बाटली होती श्याम जवळच्या टपरीवर गेला,

आणि विचारलं कुठे आहेत आजी, त्या टपरी वाल्याने मला पाहिलं आणि तो बोलला त्या वारल्या दोन महिने झाले. ऐकून खूप वाईट वाटलं मन सुन्न झालं जणू कोणीतरी जवळचा गेलं होतं श्यामने त्यांच्या वाटेकडे पाहिलं कोरडी पडली होती. श्यामने त्याच्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि,

तो निघाला तिथून सहज मागे वळून पाहिलं तर पेढा खायला चिमण्या आल्या होत्या आणि त्या पाणी पीत होत्या श्यामने आजींचा झोपडीकडे पाहिलं, आजी मात्र दिसत नव्हत्या आजी श्यामला जीवनाचा फार मोठा वास्तव देऊन गेल्या वाटल्याने ते वाढतं मग ते प्रेम असो अथवा आनंद सुख दुसऱ्याला देणे हेच खरे जीवन!

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.