अमृतसरच्या सुवर्ण मंदिराखाली जेव्हा रहस्यमय बोगदा दिसला.. तेव्हा लोकांना शास्त्रज्ञांना देखील घाम फुटला.. बघा त्या ठिकाणी असे काय दिसले
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिरांमधील एक मंदिर आहे. जिथे दररोज लाखो भक्त येत असतात. देशातील अनेक ठिकाणचे भक्त आणि पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. शीख ध’र्माचे प्रमुख तिर्थक्षेत्र असल्यामुळे या मंदिराने अमृतसरला त्याच्या भव्यते सोबतच अजून प्रसिद्ध केले आहे. मित्रांनो सुवर्ण मंदिराला श्री दरबार साहेब आणि,
हर्विंदर साहेब या नावाने देखील ओळखले जाते. सुवर्ण मंदिराला सर्व ध’र्म समभाव असलेले मंदिर सुद्धा मानले जाते. हा गुरूद्वारा भक्तांसोबतच पर्यटकांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित करतो. सुवर्ण मंदिराला ‘सुवर्ण मंदिर’ हे नाव त्याच्यावर बाहेरील भागावर असलेल्या सोन्याच्या भिंतीवरून पडले आहे. या मंदिराच्या स्थापने नंतर २०० वर्षांनी महाराजा रणजित सींग यांच्या द्वारा,
या मंदिराला सोन्याच्या भिंती बांधण्यात आल्या होत्या. याआधी मंदिराला दरबार साहेब आणि हर्विंदर साहेब या नावाने ओळखले जायचे. तेथे असलेले अमृत सरोवर हे तेथील प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. या सरोवरात औ-षधी गुण आहेत असे मानले जाते. जो कोणी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतो तो सर्व प्रथम या सरोवर मध्ये हात-पाय धुतो आणि मगच मंदिरात प्रवेश करतो. मंदिराला चार प्रवेश द्वार आहेत.
हे प्रवेश द्वार पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही बाजूला आहेत. कुठल्याही भागातून येणाऱ्या भक्तांच हे मंदिर मनापासून स्वागत करते. अशी या प्रवेश द्वाराची ओळख आहे. या मंदिरात कुठल्याही ध’र्माच्या लोकांना, कुठल्याही जा’तीच्या लोकांना तसेच कुठल्याही पर्यटकांना येण्याची अनुमती आहे. सुवर्ण मंदिर मध्ये रोज सगळ्यात जास्त अन्न दान केलं जातं.
या मंदिरात रोज लाखोच्या संख्येने भक्तांना जेवण दिलं जात. बाकी मंदिरांमध्ये आपण त्या मंदिराच्या पायऱ्या वरच्या दिशेने जातात असे पाहतो परंतु या मंदिरातील पायऱ्या उलट दिशेने म्हणजे खालच्या बाजूस जाताना दिसतात. सुवर्ण मंदिरत त्याच्या सुंदरते बरोबर अनेक रहस्य लपलेली आहेत. ही गोष्ट आहे २०२१ मधली शिरुमनी गुरुद्वारा कमिटीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिरामध्ये,
येणाऱ्या भक्तांसाठी चप्पल ठेवण्यासाठी जागा करण्याचे ठरविले. या साठी लोकांनी या मंदिराच्या आवारात खोदकाम सुरू केले. खोदकाम करता-करता लोकांना एक गोष्ट लक्षात आली की, जमिनीच्या आत एक सुरंग आहे जी खूप खोल आहे हे पाहून लोकही आश्चर्य चकित झाले. याची सूचना मंदिराच्या कमिटीला देण्यात आली. कमिटीच्या अधिकाऱ्यांनी येऊन निरीक्षण केले असता त्यांनी अजून खोदकाम करण्याचे,
आदेश दिले. त्याठिकाणी असलेल्या काही लोकांनी असे सुचवले की या सुरंगची पुरातत्त्व विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी जेणेकरून या सुरंग बाबत अजून माहिती मिळवता येईल म्हणजेच ती सुरंग कोणत्या साली आणि का बनवण्यात आली होती याची माहिती मिळवता येईल. परंतु मंदिर कमिटीने यासाठी अनुमती दिली नाही. कमिटीचे म्हणणे असे होते की,
या सुरंगच्या मागे कोणताच इतिहास नाही हा सुरंग भरून टाकण्यात यावा परंतु या गोष्टीवर खूप वा’द विवाद झाले आणि हा विषय उच्च अधिकाऱ्यांकडे गेला. उच्च अधिकाऱ्यांनी निर्णय दिला की, या सुरंगची पुरातत्त्व विभागा कडून चौकशी व्हायला हवी. अशी अनेक इतिहास कालीन मंदिरे आहेत ज्यांच्यामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत.
काही रहस्य आपल्या समोर येतात परंतु काही रहस्य अजूनही उलगडता आली नाहीत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.