पती-पत्नीने बेडरूम मध्ये हि गोष्ट दररोज करायला हवी.. यामुळे एकमेकांवरील प्रेम वाढेल.. ताण तणाव कमी होईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अशा काही गोष्टी जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडतात. त्यापैकी एक लग्न आहे. हिं’दू ध’र्मात हा विवाह संस्कार मानला जातो. यामुळेच हिं’दू ध’र्म मानणारी प्रत्येक व्यक्ती विवाहाच्या बंधनात बांधली जाते. मात्र यालाही अपवाद आहे. काही लोकांना लग्न करायचे नसते. लग्न हा प्रत्येक व्यक्तीसाठी,
खूप महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि त्याचे प्राधान्यक्रमही बदलतात. लग्नानंतर प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात दुसरी स्त्री येते, जिला त्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याला प्रेम द्यावे लागते. एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी असेल तर पृथ्वीवरच स्वर्गाची अनुभूती सुरू होते. पण याउलट वैवाहिक जीवन सुखी नसेल तर,
त्या व्यक्तीचे जीवन त्रासदायक आणि दुःखांनी भरलेले असते. आजच्या काळात बहुतेक लोकांसोबत हेच घडत आहे. आज पती-पत्नीमधील प्रेमाचा अभाव सहज दिसून येतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पती आणि पत्नीणे या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत :- एकांतात राहूनही पती-पत्नी एकमेकांवर काहीतरी बोलत राहतात,
असं अनेकदा पाहायला मिळतं. तर बेडरूममध्ये पती-पत्नीने फक्त स्वतःबद्दलच बोलावे. अशावेळी तिसर्या व्यक्तीबद्दल बोलल्याने वैवाहिक जीवन धोक्यात येते. सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घ्या. जर तुमचा पार्टनर एखाद्या गोष्टीवर रागावला असेल तर त्याच्यावर रागावू नका, तर त्याला प्रेमाने जवळ करा.
एकाच गोष्टीसाठी दोघांनाही राग आला तर मुद्दा बनण्याऐवजी आणखी बिघडतो. माणसाला राग आला की त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता संपते. त्यामुळे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि यासोबतच त्याची विचारसरणी देखील वेगळी असते. हे आवश्यक नाही की,
तुम्ही जे योग्य मानता, तुमच्या जोडीदारानेही तीच गोष्ट योग्य मानली पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल त्याचे वेगळे मतही असू शकते. बऱ्याच वेळा एखाद्या विषयावर बोलत असताना पती-पत्नीचे वाद होतात आणि दोघेही एकमेकांशी भांडू लागतात. हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे. यामुळे नात्यात चटकन दुरावा येतो. प्रत्येक व्यक्तीला त्याची स्तुती ऐकायला आवडते.
जर त्याने जोडीदाराचे कौतुक केले तर आणखी आनंद होतो. म्हणूनच प्रत्येक पती-पत्नीने दररोज एकमेकांबद्दल किमान एक चांगली गोष्ट बोलली पाहिजे. त्यामुळे दोघांमधील प्रेम वाढते. मित्रांनो वैवाहिक जीवनात रो’मॅन्स खूप महत्वाचा असतो. यामुळे आपले नाते घट्ट बनते. दिवसभराचा आलेला कंटाळा निघून जातो, थकवा नाहीसा होतो,
ताण तणाव कमी होतो म्हणून मित्रांनो यासाठी वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये नियमित रो’मॅन्स आणि प्र-णय होणे खूप गरजेचे आहे. जे लोक या गोष्टींना वेळ देत नाहीत त्यांचे वैवाहिक जीवन खूप कांटाळवाणे असू शकते. यामुळे त्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम कमी होते. चिडचिड वाढू लागते, कामामध्ये लक्ष देखील लागत नाही.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.