द्रौपदी भीम चा व’ध का करणार होती ? भीम ने तिच्यासोबत असे काय केले होते पहा.. ज्यामुळे ती..

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, महाभारतात एक गोष्ट स्पष्ट होते की पांडवांमध्ये द्रौपदीला अधिक प्रेम देणारा कुंती पुत्र भीम होता. कारण जिथे द्रौपदीच्या स्वाभिमानाचा, सन्मानाचा, न्यायचा प्रश्न उपस्थित व्हायचा तेथे भीमाने आवाज उठवला होता. परंतु असे काय झाले होते ज्याच्यामुळे द्रौपदीला आपला पती भीमची ह’त्या करण्याची इच्छा झाली होती. एके दिवशी अर्जुनाला माहित झाले की,
आपली पत्नी द्रौपदी ही सामान्य स्री नसून काली मातेचेच एक रूप आहे. याची माहिती मिळताच अर्जुन आपल्या पत्नीची सेवा करू लागला. द्रौपदी सोबत विवाह झाल्यानंतर पाचही पांडवांनी असा ठराव केला होता की एकावेळी एकच पांडव द्रौपदी सोबत वेळ व्यतीत करेल. द्रौपदी सोबत त्या कक्षात जो कोणी पांडव असेल तो दरवाजा बाहेर आपल्या चपला काढून ठेवेल जेणे करून,
बाकी पांडवांना कळेल की, द्रौपदीच्या कक्षात पाच पांडवापैकी एक पांडव आहे. एके दिवशी भीमाने कक्षा बाहेर चपलांवरती लक्ष दिले नाही आणि तो थेट कक्षात गेला. पक्षाच्या आत जाताच भीम ने पाहिले की अर्जुन आपली पत्नी द्रौपदी हिचे पाय दाबत आहे. हे पाहून भीमाला फार राग आला. राग अनावर न झाल्याने भीम ने अर्जुनावर आपल्या गदेने प्रहार केला.
हे पाहताच द्रौपदीने भीमला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु भीम चा राग शांत होत नव्हता. थोड्या वेळात ध’र्मराज युधिष्ठिर तेथे आले. युधिष्ठिरने भीम ला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या पत्नीचे म्हणजेच एका नारीचे पाय अर्जुनाने दाबून दिले याचा राग भीमला येत होता. नकुल आणि सहदेव सुद्धा तेथे येऊन भीम ला समजवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु भीमचा राग या सगळ्याच्या पलीकडे गेला होता.
रागाचा पारा एवढा मोठा होता की भीम ने आपले घर सोडून जंगलात जाण्याचे ठरवले. चालता चालता रात्र झाली आणि भीमाने ठरविले की, तो तिथेच विश्राम करेल. एका वटवृक्षावरती जाऊन भीम झोपला वटवृक्षाच्या खाली एक मैदान होते. त्या मैदानावर गवत उगवले होते मध्यरात्री एक व्यक्ती त्या मैदानावर येऊन त्या गवताला पाणी घालू लागला. देवी देवतांच्या सभेचे आयोजन होत असताना भीम ने पाहिले.
सभेसाठी सर्व देवी देवता तेथे उपस्थित झाले. स्वतः चालू असतानाच तेथे द्रौपदीचे आगमन झाले द्रौपदीने रुद्र अवतार धारण केला होता. ती घडलेल्या सर्व प्रकार देवी देवतांना सांगत होती हे सर्व पाहून भीमला अर्जुन द्रौपदीचे पाय दाबून सेवा का करत होता याचे कारण समजले. द्रौपदीचा रुद्रावतार पाहून श्रीकृष्ण यांनी द्रौपदीची समजूत काढली आणि,
महाभारत यु-द्ध विषयी सांगितले हे ऐकून भीमला फार आश्चर्य वाटले. सभा समाप्त होऊन सर्व देवी देवता तेथून निघून जातात भीम झाडावरून खाली उतरला आणि द्रौपदी सामान्य स्त्री नसून ती त्याचेच प्राण घेऊ इच्छित आहे याबद्दल विचार करू लागला. भीमने हस्तिनापुरात पुन्हा जायचे ठरवले आणि कृष्णाशी यावर चर्चा करण्याचे ठरवले. भगवान श्रीकृष्णाने भीमला सांगितले की,
द्रौपदी सामान्य स्त्री नसून महाकालीचेच रूप आहे. भयभीत झालेल्या भीमने यावर उपाय देण्याची विनंती केली तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, जोपर्यंत द्रौपदी स्वतः तुला समजवायला येत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करू नकोस, जेव्हा द्रौपदी तुझ्याजवळ येईल तेव्हा तिच्याकडून तीन वरदान मागून घे. घरातील सर्व सदस्यांनी भीमला समजावण्याचा प्रयत्न करून ही भीम अन्नग्रहण करण्यास तयार होत नव्हता,
जेव्हा द्रौपदी समजूत काढण्यासाठी भीम जवळ आली तेव्हा भीम ने तिच्याकडून पाचही पांडवांना जीवनदान देण्याचे आणि श्रीहरी ला सुध्दा क्षमा करण्याचे वरदान मागून घेतले. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.